New Delhi : आज, 29 जुलै रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP-National Education Policy) बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचं (Akhil Bhartiya Shiksha Samagam) उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिक्षेचं महत्त्व पटवून देताना भविष्यातील शैक्षणिक बदलांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दहावी आणि बारावी ऐवजी नवीन शिक्षण प्रणाली राबवण्यात येणार असून CBSE अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
![]() |
National Education Policy: Breaking News !! आता CBSE अभ्यासक्रमात होणार मोठा बदल; 10 + 2 ऐवजी नवीन शिक्षण पद्धत येणार ; मोदींची नवी घोषणा |
आज 29 जुलै रोजी माननीय पंतप्रधान मोदी यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देतानाच भविष्यातील शैक्षणिक बदलांबद्दल एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. ( PM Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अर्थातच NATIONAL EDUCATION POLICY च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचे ( Akhil Bhartiya Shiksha Samagam ) उद्घाटन केलं. याच प्रसंगी येत्या काळात दहावी आणि बारावी ऐवजी नवीन शिक्षण प्रणाली राबवण्यात येणार असून CBSE अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पारंपरिक ज्ञान प्रणालीसोबतच भविष्यातील तंत्रज्ञानाला संतुलित अशा पध्दतीने महत्त्व देण्यात आले आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितल. ते पुढे हे देखील म्हणाले की,
देशातील शिक्षणतज्ज्ञांनी संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना नवीन व्यवस्थेची चांगली माहिती आहे. 10+2 शिक्षण पद्धतीच्या जागी 5+3+3+4 शिक्षण पद्धत सुरू केली जात आहे. भारताला संशोधन आणि नवीन कल्पनांचे केंद्र बनवण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.'
या सोबतच येत्या काळात देशातील सर्व सी बी एस ई (CBSE) शाळांत एकच अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. यासाठीच 22 भाषांत पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणावरही पंतप्रधान मोदींनी बोलताना विशेष भर दिला.
याच कार्यक्रमावेळी पीएमएसश्री योजनेचा पहिला हप्ताही जारी करण्यात आला.
पंतप्रधान मोदी हे सुद्धा विशेषपणे म्हणाले की, "देशाचे नशीब बदलण्याची ताकद शिक्षणातच आहे. देश ज्या ध्येयाने पुढे जात आहे, त्यात शिक्षणाची भूमिका विशेष महत्त्वाची आहे.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.